Advertisement

अपघातात जखमींना मदत केल्यास मिळणार 25 हजारांचे बक्षीस

नागपूरAi News All India|  

दरवर्षी रस्त्यावरील अपघातात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागतो. वेळ नाही, पोलीस आपल्यालाच अडकावतील, कोण पडेल या झंझट मध्ये असे म्हणत बरेच जण अपघातग्रस्ताची मदत करत नाहीत. अपघात ग्रस्ताना वेळेत उपचार मिळाला तर कित्येक लोकांचा जीव वाचू शकतो. अपघातातील जखमी लोकांची मदत न करण्याची लोकांची ही सवय बदलण्यासाठी आणि त्यांना माणुसकी दाखवत अपघातग्रस्ताची मदत करायला प्रवृत्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी अत्यंत एक महत्वाचा व मोठा निर्णय घेतला आहे.

अनेक प्रकरणात पोलीसांना साक्षीदार मिळत नाहीत. अश्या स्थितीत ज्या व्यक्तीने पोलीसांना या अपघाताची माहिती दिली असते त्या वक्तीलाच साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न केला जातो. रस्ते अपघातातील पीडितांना मदत करणारे पोलीसांच्या कायदेशीर कायदेशीर कार्यवाहीचा भाग बनतात. त्यात त्यांचा खुप वेळ जातो, तसेच त्यांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे अनेक जण पोलीसांना अपघाताची माहिती देणं टाळतात. काही घटनांमध्ये अपघातग्रस्ताची मदत करणाऱ्या व्यक्तीला या अपघात प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन साक्षिदार बनवण्याचा प्रयत्न केला जातो. अश्या त्रासामुळे रस्त्यावरील व्यक्ती अपघातग्रस्ताना मदत करण्यास उत्सुक नसते.

सिने. अभिनेते अनुपम खेर यांच्या बरोबर नागपुर मध्ये रस्ता – सुरक्षेबाबत आयोजित एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, मी रस्ते वाहतूक मंत्रालयाला बक्षिसाची रक्कम खुप कमी आहे. अपघातग्रस्ताना रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला पाच हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. मात्र मी बक्षीसाची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यावर कोणीही एखादा अपघात पाहिला तर एका तासाच्या आत अपघातग्रस्ताला रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला 25 हजारांचे बक्षीस दिले जाईल. सद्या ही रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे, म्हणजेच ही रक्कम पाच पटीने वाढवली जाणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

गडकरी पुढे म्हणाले की, सरकार आता अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी पहिल्या सात दिवसासाठी 1.5 लाख रुपयांपर्यंतचा हॉस्पिटल खर्च कव्हर करेल. ही योजना राष्ट्रीय महामार्गावर जखमी झालेल्या लोकांनाही लागू होते, असे ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *